पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोशल मीडिया: घरबसल्या कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन

इमेज
सोशल मीडिया: घरबसल्या  कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे फक्त संवादाचे माध्यम राहिलेले नाही, किंवा त्याकडे केवळ फालतू टाईमपास म्हणून बघण्यापेक्षा त्यातून बक्कळ कमाई करता येते हे समजून घेणं आवश्यक आहे. सोशल मीडिया कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन बनले आहे. जवळपास प्रत्येक हातात मोबाईल आहे. मोबाईलचा सुयोग्य वापर केल्यास प्रचंड कमाईचं साम्राज्य उभा करता येतं. सोशल मीडिया म्हणजे नवनवीन संधीचं दालन. आजच्या काळात सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्केटिंग टूल ठरलं आहे. डिजिटल स्कील शिकणं म्हणजे स्वतः मध्ये गुंतवणूक करणं जी तुम्हाला नक्कीच परतावा देते. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे जग आपल्या कवेत आणि मुठीत आले आहे. आज जवळजवळ प्रत्येकाकडे मोबाईल आणि इंटरनेट आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स (ट्विटर), लिंक्डइन किंवा अगदी व्हॉट्सअपवरूनही अनेकजण स्वतःचा व्यवसाय, ब्रँड किंवा कला जगभर पोहोचवत आहेत. १. सोशल मीडिया म्हणजे संधींचं जग- पूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा खर्च आणि बाजारपेठ लागायची. पण आज सोशल मीडिया तुमची मोफत बाजारपेठ आहे. तुम...

💐 ५ वे पुण्यस्मरण 💐

इमेज
💐🙏 पाचवे पुण्यस्मरण 🙏 💐 कै. दत्तू बाबू सूर्यवंशी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) प्रिय बाबा, तुम्ही आम्हाला सोडून देवाघरी गेल्याला ५ वर्षे पूर्ण झाली, पण तुमच्या आठवणींचा सुगंध आजही आमच्या जीवनात  दरवळत आहे. कुटुंबाचा आधारवड हरवला हे दुःख अजूनही मनाला चटका लावून जाते. तुमचं संपूर्ण आयुष्य म्हणजे... कष्ट, संघर्ष आणि जिद्दीचं जिवंत उदाहरण होतं. तुम्ही शिकवलं - संघर्षाला कधीही घाबरू नका, सत्य आणि प्रामाणिकतेचं शस्त्र हातात घेऊन आयुष्य जगायचं, आणि कोणत्याही परिस्थितीत शांतता राखायची. कष्टाची भाकरी खायची. आयुष्याच्या रणभूमीतून कधीही पळ काढायचा नाही. तुमचे संस्कार, शिकवण आणि आदर्श हा आमचा सर्वात मोठा वारसा आहे. आणि आम्ही तो आयुष्यभर जपत राहू.  शरीराने तुम्ही आमच्यात नसला, तरी विचारांनी, शिकवण आणि प्रेमाने तुम्ही सदैव आमच्यात जिवंत आहात. बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो, आणि आपले आशीर्वाद आमच्यावर सदैव राहोत, हीच आमची मनःपूर्वक प्रार्थना. 🌹 संपूर्ण सूर्यवंशी परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली 🌹 आपला सुपुत्र -  संभाजीराव सूर्यवंशी 🥹

देवाची योजना: अज्ञात, कडू, गोड पण शेवटी आपल्या भल्यासाठीच असते...!

देवाची योजना – अज्ञात, कडू, गोड पण शेवटी आपल्या भल्यासाठीच असते.!  माणसाचं आयुष्य अनाकलनीय, अकल्पित, गूढ आणि रहस्यमय असतं. त्याच्या आयुष्यात कधी काय घडेल सांगता येतं नाही.  माणूस हा झाडावरून गळालेल्या शुष्क पानासारखा असतो. नशिबाचा  वारा सुटला तर ते पान उंच पर्वताच्या शिखरावर पोहचते किंवा एखाद्या खोल दरीत पडून कुजून जातं. कदाचित ते निर्जीव पान समुद्राच्या लाटेवरून ऐलतीरावरून पैलतीरापर्यंत सुखरूप जाऊ शकतं किंवा एखाद्या अग्निकुंडात सापडून जळून खाक होतं. नशिबाची साथ लाभली तर ते पान पंख फुटलेल्या पक्ष्यासारखं आकाशात घिरट्या घालतं आणि नशिबाची साथ नाहीच लाभली तर ते पान मातीमोल होऊन जातं. माणसाचंही असंच होतं.  नशिबाची साथ लाभली तर माणूस कुठच्या कुठे पोहचू शकतो.  नशिबापुढे आपण सगळेच हतबल ठरतो.  आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्या आपण अपेक्षितच केलेल्या नसतात. कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, तर कधी अगदी उलट. त्या वेळी आपण देवावर रागावतो, निराश होतो, प्रश्न विचारतो — “हे माझ्यासोबतच का?” पण थोडा काळ गेला की लक्षात येतं — देवाची प्रत्येक योजना आपल्य...