माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला पण...
माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला पण... "कोट्यवधी मैलांवरील तारे, उपग्रह पाहण्यासाठी मानवाने दुर्बीण बनवली खरी... पण शेजारी बसलेल्या माणसाच्या मनात नेमके काय चालले आहे हे शोधून काढणारी दुर्बीण मात्र माणूस बनवू शकला नाही." माणूस पोहोचला ताऱ्यांपर्यंत, उपग्रहांपर्यंत… पण मनाच्या अंतराळात अजूनही भरपूर अंधार आहे! आज विज्ञानाच्या प्रगतीने आपण कोट्यवधी मैलांवरील ताऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. दुर्बिणीच्या साहाय्याने आपण आकाशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण चंद्रावर पाऊल टाकले, मंगळावर मोहीम पाठवली… पण अजूनही एक जागा आहे, जिथे आपण पोहोचू शकलो नाही ती म्हणजे माणसाचे मन. आकाशा पेक्षा कितीतरी विस्तृत, पॅसिफिक समुद्रापेक्षा किती तरी सखोल, विमानापेक्षा किती तरी पटीने वेगाने धावणारे मन माणसाला लाभले आहे ज्याचा थांगपत्ता कुणाला लागुच शकणार नाही. आपण यंत्रं, तंत्रज्ञानं आणि नवनवीन साधनं निर्माण केली. अदृश्य पाहिलं, अमाप मोजलं… पण आजवर असं कोणतंही उपकरण निर्माण झालेलं नाही, जे आपल्यासमोर बसलेल्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे समजू शकेल. ज्ञान वाढलं… पण संवेदनशीलता हरवली!...